Pune City News
महाराष्ट्र

मोदी फक्त इव्हेंट करण्यात पटाईत : मंत्री जितेंद्र आव्हाड

Pune City News :- मोदी फक्त इव्हेंट करण्यात पटाईत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तर लोकांची चूल कशी पेटेल, यावर साहेब बोलतील, असं वाटलं होतं, मात्र त्यांनी दिवा पेटवण्याचा संदेश दिला, अशा शब्दात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
★ आव्हाड म्हणाले :

▪️ आम्हाला वाटले, मोदी काहीतरी आधार देतील. काय उपाययोजना केल्या, याची माहिती देतील,

▪️ किती औषधे, मास्क आहेत, डॉक्टरांना किती साहित्य देऊ, याची माहिती देतील. पण मोदी फक्त इव्हेंट करण्यात पटाईत आहेत.

▪️ लोकांच्या जीवनात अंधार आलाय, तो दूर करण्यासाठी मोदींनी प्रकाश देण्याची गरज होती. मात्र टाळी-थाळीनंतर पंतप्रधान आता दिवे लावण्याचा इव्हेंट करत आहेत.

▪️ कोव्हीड 19 शी लढण्यासाठी हॉस्पिटल, व्हेंटिलेटर आणि टेस्टिंग लॅबची गरज आहे. हे पब्लिसिटी स्टंट थांबवा आणि काही ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

Related posts

कोरोना लस मोफत मिळणार की नाही? उद्या होणार निर्णय

Vishal Khandagale

एल्गार परिषदेला राज्य सरकारची परवानगी

Vishal Khandagale

सुशांतची हत्या नव्हे तर आत्महत्याच; एम्सकडून शिक्कामोर्तब

Vishal Khandagale

Leave a Comment