Pune City News :- जनता संचारबंदीनंतर सोमवारी नागरिकांनी रस्त्यावर येत गर्दी केल्याने शासनाकडून संचारबंदी करण्यात आली.तरीही शहरवासीयांकडून किराणा दुकान व भाजीमंडईत गर्दी केली जात आहे.
अत्यावश्यक म्हणून भाजीपाला, दूध विक्री व किराणा विक्री सुरूच राहील, असे शासनाकडून सातत्याने जाहीर करण्यात येत आहे. मात्र नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
किराणा व भाजीपाला घराजवळील दुकानातून खरेदी करणे अपेक्षित असताना नागरिक भाजीमंडईत गर्दी करीत आहेत.
दरम्यान, पिंपरीतील मुख्य बाजारपेठेतील किराणाच्या ठोक विक्रीच्या दुकानांमध्ये रांगा लावून गर्दी केली. त्यामुळे नागरिकांनी संचारबंदी झुगारले असल्याचे दिसून आले.

