राज्यात येत्या 15 सप्टेंबरपासून ‘स्वास्थ्य महाराष्ट्र’ मोहीम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबवण्यात येणार आहे.
या मोहिमेंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची माहिती घेऊन सारी, इतर व्याधी आणि 60 वर्षांपुढील नागरिकांचा डाटा तयार केला जाणार आहे,
अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
ही मोहीम 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर अशा दोन टप्प्यात राबवण्यात येणार आहे.
मोहिमेंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींमध्ये सारी, इतर व्याधी किं वा अन्य लक्षणे असल्यास ती नोंदवली जाणार आहेत.

