Pune City News:- राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता राज्य सरकारनं खबरदारी म्हणून, जीवनावश्यक सेवा वगळून मुंबई महानगर प्रदेशसह नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकाने आणि कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा बंदचा निर्णय 31 मार्च नव्हे, तर पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुढे रोखठोक दादा म्हणाले…
▪ लग्न समारंभ आणि अंत्यविधीसाठी गर्दी करू नका.
▪ व्यापाऱ्यांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे.
▪ रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना मालकांनी वेतन द्यावे.
▪ पुढील पंधरा दिवस महत्त्वाचे आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे.
▪ ग्रामीण भागातील रुग्णालयेही तयार ठेवण्यात आली आहेत.
▪ नगरपंचायत आणि नगरपरिषदेला निधीची कमतरता भासणार नाही.
previous post

