Pune City News
आरोग्यकोरोनामहाराष्ट्र

पहिली ते आठवीचे विद्यार्थी परीक्षाविना थेट पास होणार

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जाणार आहे.

या विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची महत्त्वाची घोषणा केली.

शालेय शिक्षणमंत्री काय म्हणाल्या? :

● राज्यात कोरोनाची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. पहिली ते आठवी वार्षिक मूल्यमापन याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.

● गेल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन, युट्यूब, गुगल या माध्यमातून आपण शिक्षण सुरु ठेवलं.

● खरतर पहिली ते चौथीच्या शाळा सुरु झाल्या नाहीत. तर पाचवी ते आठवी या शाळा सुरु झाल्या.

● पण काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या त्या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झाले नाही. विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावे असा प्रयत्न होता.

● पण सध्या कोरोनाची स्थिती पाहता पहिली ते आठवीचे विद्यार्थ्यांचे वर्षभराचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे.

● त्यात या विद्यार्थ्याने कशाप्रकारे अभ्यास केला हे बघितले पाहिजे. पण आताची परिस्थिती बघता हे यावर्षी होण शक्य नाही.

● राज्यातील जे पहिली ते आठवीचे जे विद्यार्थी आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे.

Related posts

पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 17 वर

Vishal Khandagale

कोरोना : उपायांसाठी 50 लाख रुपयांचा निधी : खासदार गिरीष बापट

Vishal Khandagale

पुण्यातून राज्य चालवा नाहीतर पुण्याला नवा पालकमंत्री द्या- चंद्रकांत पाटील

Vishal Khandagale

Leave a Comment