भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी लडाखमध्ये सुरु असलेल्या घडामोडींबद्दल मोठे विधान केले आहे. पूर्व लडाखमधील पँगाँग टीएसओसह काही भागातून चीन मागे हटायला तयार नाही.
- लष्करी स्तरावर चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही अजूनही हा पेच सुटू शकलेला नाही. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सीडीएस बिपीन रावत यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
- पूर्व लडाखमध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे अतिक्रमण परतवण्यासाठी लष्करी कारवाईचा पर्यायही खुला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
- दोन देशांमधील लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवरील चर्चेतून काही तोडगा निघाला नाही, चर्चा निष्फळ ठरली तरच लष्करी पर्याय वापरावा लागेल असे बिपीन रावत यांनी म्हटले आहे.
- संरक्षण दलांवर सीमेवर लक्ष ठेवण्याची, टेहळणीची आणि अतिक्रमण रोखण्याची जबाबदारी असते. संरक्षण दलं लष्करी कारवाईसाठी नेहमीच सज्ज असतात” असे सीडीएस रावत म्हणाले.

