अपघातांना आळा घालण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर या महामार्गावरील बेशिस्त वाहनचालकांना आजपासून लगाम घालण्यात येणार आहे.
- ओव्हरलोड, ओव्हरस्पीड आणि उलटय़ा दिशेने येणाऱ्या वाहनांवर गस्ती वाहने व मोबाईल कॅमेऱ्याच्या मदतीने लक्ष ठेवण्यात येईल.
- बेशिस्त वाहन चालवताना पकडल्यास तीन वेळा सुधारण्याची संधी दिली जाईल.
- चौथ्यांदा पकडल्यास थेट ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.
- दरम्यान मुंबई-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर दर महिन्याला सरासरी 27 जणांनी प्राण गमावले आहेत.

