सारथी संस्था ‘बंद’ करून तारादूतांना देशोधडीला लावण्याचा प्रकार महाआघाडी सरकारने करू नये. अन्यथा, गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे.
४८० तारादूतांना तात्काळ नियुक्त्या द्या…
महाराष्ट्रातील मुलांच्या जिवाशी कोणीही खेळू नये, अन्यथा यानंतर आम्ही बारामतीत आंदोलन करू…
अशी मागणी आज आंदोलनात संभाजी ब्रिगेड’चे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे मध्य जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, महादेव मातेरे, मंदार बहिरट, विनायक घुले, मोहिनी रणदिवे, अतुल येवले, निलेश ढगे, बाळू थोपटे, पप्पू पांडव व जयदिप रणदिवे आदी उपस्थित होते.

